अंधशाळेचा कायापालट करण्यासाठी साईभक्तांनी दाखविलेले औदार्य कौतुकास्पदःडॉ. विनायकराव चव्हाण

अंधशाळेचा कायापालट करण्यासाठी साईभक्तांनी दाखविलेले औदार्य कौतुकास्पदःडॉ. विनायकराव चव्हाण

( चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

 रा.स.शि.प्र. मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळा चाळीसगाव या शाळेचा दिव्यांग विद्यार्थी हितासाठी कायापालट करून अनेक विविध भौतिक सुविधा शाळेचे नूतनीकरण कलर तसेच तीन अंध विद्यार्थ्यांचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देणारी ठाणे येथील साईभक्त सदाशिव वैद्य सर व साईभक्त श्रीधर चारी सर यांचा सत्कार दिनांक 4/10/2025रोजी संस्थेचे चेअरमन साहेब डॉक्टर विनायकराव यशवंतराव चव्हाण व संस्थेचे सचिव बाळासाहेब विश्वासराव चव्हाण यांच्या हस्ते अंधशाळेत स्मृतीचिन्ह मानपत्र शाल व श्रीफळ तसेच बुके देऊन यथोचित असा सन्मान करून गौरविण्यात आले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी केले तसेच सूत्रसंचालन शाळेचे संगीतशिक्षक श्री. अभय कसबे यांनी केले आभार श्री .संजय घोडेराव यांनी मांडले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे विशेष शिक्षक आनंद गायकवाड, सर ज्ञानेश्वर अल्हाटे , अशोक पाटील , महेश शिंदे, सर बी के बागुल , तसेच शाळेचे अधीक्षक राजवल्ली जमादार, लिपिक स्नेहा मोरे, काळजीवाहक दत्ता धोटे, राजेंद्र राठोड , शंकर देशमुख, श्री भगवान रील , श्री मनोज पारधी श्रीमती कल्पना पारधी ,राजश्री मगर, व वत्सला मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

     अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन डॉक्टर विनायकराव चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की रा.स.शि.प्र.मंडळाच्या अंधशाळेच्या कायापालट करण्यासाठी औदार्य दाखविणारे साईभक्तांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. संस्थेच्या वार्षिक सभेत देखील आपण केलेल्या सर्व कामांचा आम्ही उल्लेख केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

   संस्थेचे सचिव श्री.बाळासाहेब विश्वासराव चव्हाण व संचालक सुनिल देशमुख यांनी देखील आपल्या भाषणात श्री सदाशिव वैद्य सर व श्री श्रीधर चारी सर यांनी केलेल्या 50 लक्ष रुपयांच्या सर्व कामांचा उल्लेख करून गौरवोद्द्गार काढले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.