⭕गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा ⭕ अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली वृताची दखल. 

⭕गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा

⭕ अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली वृताची दखल. 

गडचिरोली,  (जिल्हा प्रतिनिधी .) – जिल्ह्यात जाहिरात न देता व मुलाखती न होता कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची पदभरती या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आपला खुलासा सादर केला. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदभरती प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसून उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

अधिकृत जाहिरात व सूचना संकेतस्थळावरच नमूद करण्यात येत असल्याचे सांगितले. 

जिल्हा परिषदेमार्फत वेळोवेळी कंत्राटी पदांच्या जाहिराती जिल्ह्यातील दैनिक वृत्तपत्रांमध्ये तसेच जिल्हा परिषद गडचिरोलीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.zpgadchiroli.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात येतात. उमेदवारांच्या पात्र-अपात्र याद्या व भरती प्रक्रिया बाबतच्या सर्व सूचना देखील या संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिल्या जातात. उमेदवारांनी दलालांपासून सावध राहावे

अलीकडे काही अज्ञात व्यक्ती समाज माध्यमांतून नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांकडून पैशांची मागणी करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेने तातडीचा इशारा देत स्पष्ट केले आहे की – एनएचएम, जिल्हा परिषद गडचिरोली नोकरीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून किंवा मध्यस्थांमार्फत पैसे स्वीकारत नाही.

भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा गैरव्यवहारांना बळी पडू नये.

अशा प्रकरणात उमेदवारांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएचएम) यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले की, “भरती प्रक्रिया ही पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारेच पार पाडली जाणार असून कोणत्याही प्रकारच्या शंकेला वाव दिला जाणार नाही. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये. भरती प्रक्रियेतील प्रामाणिकपणा व पारदर्शकता हीच जिल्हा परिषदेची प्राथमिकता आहे.”

भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिला आहे. उमेदवार व नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर विश्वास ठेवून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें