पसरणीत वाई तालुक्यातील पहिल्या १८ के.व्ही. सोलर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

पसरणीत वाई तालुक्यातील पहिल्या १८ के.व्ही. सोलर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

पसरणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे भाग्य लाभले – सौ. हेमलता अशोकराव गायकवाड, सरपंच

वाई तालुक्यात विकासकामांमध्ये अग्रेसर असलेल्या पसरणी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामपंचायतीवर पाणीपुरवठा योजनेच्या विजेच्या बिलांमुळे येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी १८ के.व्ही. क्षमतेचा सोलर विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीवर येणारा आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या कमी होणार असून, भविष्यात प्रकल्पाची क्षमता वाढवून वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे.

युवा नेते स्वप्नील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा योजनेमुळे ग्रामपंचायतीला दरमहा सुमारे ७०-८० हजार रुपयांचे वीज बिल येत होते. या सोलर प्रकल्पामुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. गावात रस्ते, पाणीपुरवठा योजना, बंदिस्त गटारे, शालेय सुविधा यांसारखी अनेक ठोस विकासकामे या पंचवर्षीय योजनेत पूर्ण झाली आहेत. मात्र, भविष्याच्या दृष्टिकोनातून हा सोलर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प जल जीवन मिशन अंतर्गत नसून, १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आला आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य नियोजनाद्वारे निधीचा कार्यक्षम वापर करता येऊ शकतो, हे पसरणी गावाने दाखवून दिले आहे. या कामाबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त केला आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन पसरणी गावच्या सरपंच सौ. हेमलता अशोकराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वाई सुतगिरणीचे उपाध्यक्ष श्री. धर्माजी शिर्के (बापू), श्री. बाजीराव नाना महांगडे (कारभारी), श्री. आनंदराव पाटील, युवा नेते स्वप्नील गायकवाड, श्री. शिवाजी अण्णा येवले, श्री. संपत महांगडे, श्री. दीपक महांगडे, श्री. राजेंद्र येवले, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. अमोल आबा महांगडे, श्री. शशिकांत महांगडे, श्री. भानुदास नेवसे, श्री. अशोक शिर्के, श्री. प्रकाश आप्पा येवले, श्री. संजय कांबळे, श्री. दीपक नाना शिर्के, श्री. भगवान महांगडे, श्री. विलास महांगडे, श्री. दत्तात्रेय महांगडे (बापू), श्री. भानुदास शिर्के, श्री. माऊली येवले, श्री. दादा येवले, श्री. शांताराम महांगडे, श्री. मधुकर साबळे, श्री. उमेश येवले यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पसरणीच्या वतीने उपसरपंच श्री. बद्रीनाथ महांगडे, माजी उपसरपंच श्री. विशाल शिर्के, श्री. आनंदा येवले (दादा), सौ. अनिता महांगडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले. प्रकल्प उभारणीसाठी ग्रामसेवक श्री. रामदास निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या ग्रामसेवक संघटनेच्या वाई तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकल्पाच्या उभारणीप्रक्रियेत श्री. मनोज मांढरे, श्री. उत्तम गाढवे आणि श्री. चंद्रकांत महांगडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.