चाळीसगाव येथे आज नवीन उभारण्यात आलेले सुवर्णा स्मृती उद्यानाचे लोकार्पण तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेचा देखील मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

चाळीसगाव येथे आज नवीन उभारण्यात आलेले सुवर्णा स्मृती उद्यानाचे लोकार्पण तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेचा देखील मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

( चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी):- 

 आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांतून चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दोन विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज दि.२ रोजी संपन्न होत आहे. यात चाळीसगाव नगरपरिषदेच्या सुवर्णा स्मृती उद्यान नूतनीकरणच्या १० कोटी निधीतून पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण व शहराची २०५६ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेत १४२ कोटी रुपयांच्या नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.२ रोजी सायंकाळी ६ वाजता सुवर्णा स्मृती उद्यान, बसस्थानक समोर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आपल्या चाळीसगाव शहरातील ‘सुवर्णा स्मृती उद्याना’चे नुतनीकरण, उभारणी अशा ‘स्मार्ट’ पद्धतीने केली आहे. उद्यानात साकारलेल्या सुविधा उच्च दर्जाच्या असून त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जागतिक मानांकनाची मुद्रा कोरलेले आहे. जिथे पर्यावरण, अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ या तिघांची गळाभेट होते. सोबतचं चाळीसगाव शहरासाठी १४२ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमीपुजन शुभारंभही होत आहे. या योजनेमुळे पुढील तीन दशके म्हणजे २०५६ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहीत धरुन प्रति माणसी १३५ लिटर पाणी देणे शक्य होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा देखील सुरळीत होईल. योजनेत अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून शहरात चार नवीन जलकुंभांचीही उभारणी करण्यात येणार आहे. उद्यानाचा ‘लोकार्पण सोहळा’ आणि पाणीपुरवठा योजनेचा ‘भूमीपुजन शुभारंभ’ सोहळ्यासाठी तसेच स्मार्ट चाळीसगावच्या निर्माणाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त चाळीसगावकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.