तळोदा शहरातील प्राथमिक सुविधा, समस्या सोडविण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने वाचला तळोदा मुख्याधिकारी समोर समस्यांचा पाढा..

तळोदा शहरातील प्राथमिक सुविधा, समस्या सोडविण्याची मागणी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने वाचला तळोदा मुख्याधिकारी समोर समस्यांचा पाढा..

तळोदा :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ शाखा तळोदाच्या संयुक्त विद्यमाने तळोदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या समोर विविध प्रभागातील समस्या मांडून जणू समस्यांचा पाढाच वाचला.

 

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागरी सुविधा प्राप्त देणेबाबत मुख्याधिकारी समोर समस्या मांडतांना शहरातील गटारी तुंबलेल्या असून त्या स्वच्छ करणे, शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन खोदल्या मुळं रस्त्याची झालेली दुरवस्था ठीक करणे, चिनोदा रोडवरील कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर येतो व विविध प्रभागातील कचराकुंडी यांचीही विल्हेवाट लावणे. अनेक पथदिव्यांच्या पोलवरील बटनांची व दिव्यांची दुरुस्ती करणे. कॉलेज रोडवर रस्त्यावर पाणी साचत असल्याने पाण्याचा योग्य निचरा करणे. पावसाळ्यात रस्ता जलमय होतों त्यामुळे चालणं देखील कठीण होते. त्याच रस्त्यावरून मिशन हायस्कूल, कनिष्ठ, वरिष्ठ व समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक ये जा करतात त्यांच्या आरोग्याची समस्या भयंकर रुप धारण करतील यांवर जिल्हा अध्यक्ष प्रा आर.ओ.मगरे, जिल्हा सचिव अशोक सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष डॉ.एस.एन.शर्मा, प्रा.आर.व्ही.राणे व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या तर साधक बाधक चर्चा करण्यात आली.

 

यावेळी निवेदन देताना तळोदा शाखेचे अध्यक्ष डॉ एस.एन.शर्मा, सहसचिव शरद सुर्यवंशी, प्रवासी महासंघाचे सचिव प्रा.आर.व्ही.राणे, पंकज तांबोळी, जिल्हा अध्यक्ष प्रा आर.ओ.मगरे, सचिव अशोक सुर्यवंशी, जिल्हा सदस्य राजेश चौधरी, जेष्ठ साधक प्रमोद वाणी, मुस्तफा बोहरी इतर साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.