सातारा जिल्ह्यात मागासवर्गीय समुदाय असुरक्षित-मा.आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे

सातारा जिल्ह्यात मागासवर्गीय समुदाय असुरक्षित-मा.आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे

 

सातारा प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील वाढत्या अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणे, भेदभावाची वाढती संस्कृती आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

 

दौऱ्यावेळी साखरवाडी येथील बौद्ध विहार वाद प्रकरणी बौद्ध समाजाच्या बांधवांनी लोखंडे यांची भेट घेऊन घटनाक्रमाची माहिती दिली आणि निवेदन सादर केले. याप्रकरणी लोखंडे यांनी लवकरात लवकर उचित कारवाईचे आश्वासन दिले. तसेच, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. याचवेळी, सोनके गावातील बौद्ध वस्तीवरील हल्ल्याच्या प्रकरणीही बौद्ध समाजाच्या बांधवांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची हकीकत सांगितली. लोखंडे यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी आयोगाची स्थापना झाली असून, या प्रकरणांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.

 

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्यासह चळवळीतील विविध कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ लोखंडे यांना भेटले. या शिष्टमंडळाने साखरवाडी आणि सोनके येथील प्रकरणांबाबत आयोगासोबत सविस्तर चर्चा केली आणि तात्काळ कारवाईची विनंती केली. लोखंडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासकीय यंत्रणेला निःपक्षपणे आणि तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले.

 

सातारा जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोगाची सक्रिय भूमिका आणि लोखंडे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.