महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करून स्वयंपूर्ण व्हावे.- श्री निखिल मोरे, मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद, फलटण.

महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करून स्वयंपूर्ण व्हावे.- श्री निखिल मोरे, मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद, फलटण.

महिलांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग उभारावेत व स्वयंपूर्ण व्हावे. बीज भांडवल योजनेमधून सुद्धा छोटे उद्योग उभारू शकतात असे श्री निखील मोरे यांनी संबोधित केले. 

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत ज्या बचत गटातील महिलांना बीज भांडवल प्राप्त झाले आहे अशा महिलांकरिता एक दिवसाचे प्रशिक्षण आत्मनिर्भर शहर स्तर संघ , फलटण नगरपरिषद फलटण येथे आयोजित केले होते. या कार्यशाळेमध्ये जिल्हास्तरीय मुख्य प्रशिक्षक श्री लीनेश निकम यांनी विविध लघुउद्योगांची माहिती सांगितली, शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली, उत्पादनाचे पॅकेजिंग कसे असावे, त्याचे मार्केटिंग कशाप्रकारे करावे , अन्नसुरक्षा मनाचे व त्याचे महत्त्व या सर्व विषयांवर चित्रफितींद्वारे मार्गदर्शन केले. या योजनेमधून ज्या महिलांना लोन व सबसिडी मिळाली आहे व ज्यांचे उद्योग यशस्वीरित्या उभे आहेत अशा उद्योजिका महिलांचे सुद्धा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामधून महिलांना प्रेरणा मिळवून त्या उद्योग उभारणीस प्रवृत्त होतात. सर्व विषय महिलांनी समजून घेऊन त्यावर प्रश्नोत्तरे सुद्धा झाली व भविष्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा निर्धार केला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण 50 महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा याच्या फलटण विभाग प्रमुख सौ संजना आटोळे यांनी सुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. उमेद विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. विभाग प्रमुख सौ. मनाली शेटे यांनी सुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता श्री शिंदे, श्री शिरतोडे, शहर अभियान व्यवस्थापक व सौ विद्या रिठे, व्यवस्थापक यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.