कर्मचाऱ्या अभावी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा खिळखिळी. 👉 डॉक्टरांच्या कमतरतेमुळे फार्मासिस्ट आणि चतुर्थश्रेणीचे कर्मचारी करतात उपचार. 👉 कुरंडीमाल आरोग्य पथकातील घटना.

कर्मचाऱ्या अभावी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा खिळखिळी.
👉 डॉक्टरांच्या कमतरतेमुळे फार्मासिस्ट आणि चतुर्थश्रेणीचे कर्मचारी करतात उपचार.
👉 कुरंडीमाल आरोग्य पथकातील घटना.

गडचिरोली / प्रतिनिधी दि. २५/६/२०२५:-

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता आहे आणि लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळविण्यासाठी खूप दूरवर जावे लागते. जिल्ह्यात अनेक दुर्गम आणि आदिवासी वाड्या-वस्त्या आहेत, जिथे आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे.आरोग्य कर्मचारी नाहीत. असले तरी अनेक ठिकाणी डॉक्टरांचे मुख्यालयी राहाणे होत नाही. त्यामुळे, लोकांना आरोग्यसेवा देण्याचे काम फार्मासिस्ट, कंपाऊंडर आणि अन्य कर्मचारी करून आपले कर्तव्य बजावत आहेत. चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळवण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागतो,
जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नाहीत, त्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.
काही ठिकाणी जनतेला आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा, जसे की ॲम्बुलन्स, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध नाहीत, ज्यामुळे आरोग्य सेवांचा दर्जा खालावला आहे.
दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी जास्त अडचणी येतात, कारण तिथे पोहोचणे देखील खूप कठीण आहे. अनेक सरकारी आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे, लोकांना त्याचा पुरेपूर लाभ मिळत नाही,
जिल्ह्यातील गरिबी आणि कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, लोकांना आरोग्य सेवांची जास्त गरज आहे, पण ती मिळत नाही.
एकंदरीत, गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी शासन प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.असाच एक प्रकार आरमोरी तालुक्यातील भाकरुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुरंडीमाल आरोग्य पथक येथे झाला. फार्मासिस्ट पंकज होकम यांनी एका रुग्णांवर उपचार करून औषध दिले. पंकज होकम यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात चिट्टी लिहिली, रुग्णांची तपासणी करून प्रिक्शिप्शन लिहिले आणि औषधही दिले त्यामुळे हा प्रकार लक्षात आला. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी निवेदन दिले आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.