गवळीवाडा व लक्ष्मीनगर परीसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे नगरपालिकेला निवेदन
चाळीसगांव प्रतिनिधी:-
शहरातील बस स्टॅन्ड जवळील गवळीवाडा व लक्ष्मीनगर परीसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, येथील काही नागरिक नेहमीच त्यांचे जनावरे व म्हशी रस्त्यावर बांधुन शेणाचे उकिरडे घाण व मलमुत्र नाल्यामध्ये फेकतात व घाण करतात परिणामी येथील गटारी व नाले घाणीने तुटुंब भरल्याने किडे होऊन येथील नागरिकांच्या घरात दुर्गंधी पसरत असते, यामुळे साथीचे आजार पसरून
नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ स्वच्छाता मोहिम राबवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे,
या संदर्भात नुकतेच परिसरातील नागरिकांनी चाळीसगाव नगर पालिकेला निवेदन दिले असून, नगर पालिकेने याबाबी कडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सागर राखुंडे, दीपक देवरे, गोलू सपके, ओम गवळी, विनोद गवळी, अशा वाणी, मुकेश वाघरी, संदीप वाघरी, सुमित वाघरी, मिनाबाई कायस्थ, युवराज राखुंडे, काळू वाघरी, संजय वाघरी, आकाश कसबे, किरण माने, मिलिंद राखुंडे यांच्यासह या परिसरातील नागरिकांच्या सह्या आहे.













