ब्लॅकआउट जाहिर होताच नागरिकांनी आवश्यकती दक्षता घ्यावी:  जिल्हाधिकारी संतोष पाटील

ब्लॅकआउट जाहिर होताच नागरिकांनी आवश्यकती दक्षता घ्यावी:  जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा: युद्ध अथवा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेच्या कारणास्तव शासनाकडून ब्लॅकआउट (पूर्ण अंधार) जाहीर केला जातो. अशावेळी विमानहल्ला, शत्रूची नजर चुकविणे किंवा सामूहिक सुरक्षितता यासाठी प्रकाश बंद ठेवणे अत्यंत आवश्यक असते. युद्धजन्य परिस्थितीत ब्लॅकआउट च्या वेळी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. 

ब्लॅकआउट जाहिर होताच नागरिकांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. 

 

सर्व प्रकारचे प्रकाशाचे स्रोत बंद करा. घरातील, बाल्कनीतील व घराबाहेरील दिवे, टीव्ही बंद करा. खिडक्या, दरवाजे बंद करा व जास्तीत-जास्त काळोख ठेवण्यासाठी जाड पडदे लावा किंवा ब्लॅकआउट शीट वापरा. इमर्जन्सी लाइट/टॉर्चमध्ये ब्लू किंवा रेड फिल्म लावा. त्यामुळे प्रकाश लांबून जाणवत नाही. शासकिय व प्रशासनाच्या अधिकृत सूचना रेडिओ व सार्वजनिक घोषणांद्वारे व्यवस्थित ऐका व त्याचे तंतोतंत पालन करा. घरात रहा: शक्यतो घराच्या मध्यभागी रहा जिथे संरक्षण जास्त असेल.प्रथमोपचार किट, पाण्याचा साठा, टॉर्च व कोरडे अन्नपदार्थ (बिस्कीट, फरसाण इ.) जवळ बाळागा. मोबाईल नेटवर्क, विजेवर अवलंबून न राहता पॉवर बँक/रेडिओचा वापर करा. संशयास्पद वस्तुस स्पर्श करू नका. तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.वृध्द व्यक्ती, अपंग व्यक्ती, लहान मुले व आजारी व्यक्तींची विषेश काळजी घ्या. 

 

तसेच ब्लॅकआउट जाहिर होताच विनाकारण घराबाहेर फिरू नका. कारण हल्ला किंवा चुकून सैनिकांना संशय येऊ शकतो. प्रकाश पसरू देऊ नका. फ्लॅशलाइट, मोबाईल स्क्रीन यांचा प्रकाश बंद करावा. गोंधळ किंवा अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. सायरन अथवा अर्लटकडे दुर्लक्ष करू नका. सतर्क राहा, वेळेवर सुरक्षितस्थळी पोहोचा. शासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करू नका. सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा. विनाकारण एकाच ठिकाणी जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होवू नये.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.