मानिकगड सिमेंट कंपनी येथील सुरक्षा रक्षक कामगार सेनेला शिवसेनेच्या पाठबळामुळे यश

मानिकगड सिमेंट कंपनी येथील सुरक्षा रक्षक कामगार सेनेला शिवसेनेच्या पाठबळामुळे यश

 

मानिकगड सिमेंट कंपनी येथील सुरक्षा रक्षक कामगार सेनेला शिवसेनेच्या पाठबळामुळे यश

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे 

दि.20/08/2025 बुधवार रोजी चंद्रपूर येथील केंद्रीय कामगार श्रम आयुक्त कार्यालय चंद्रपूर येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त श्री प्रशांत सिंघ यांच्या उपस्थितीत एस.आय.एस सेक्युरिटी फोर्स चे पदाधिकारी राकेश सिंग यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बंडूभाऊ हजारे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेना कोरपणा तालुका प्रमुख राकेश जी राठोड गडचांदूर शहर प्रमुख विकी भाऊ राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत माणिकगड सुरक्षा रक्षक यांचा 12 तासावरून 08 आठ तास तासिका वेळ ठरवण्यात आली व यावर सहाय्यक कामगार आयुक्त यांची मंजुरी घेण्यात आली . या अगोदर सुरक्षा रक्षकांना बारा तास तासिका शिफ्ट असायची आता आठ तासाची शिफ्ट करण्यात आली असल्याने सर्व कामगारा मध्ये उत्साहाचा वातावरण निर्माण झाली आहे .
शिवसेना हा पक्ष कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी झटणारा पक्ष असून अन्याय अत्याचाराविरोधात लढणारा पक्ष आहे असे प्रतिपादन शिवसेना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री बंडूभाऊ हजारे यांनी व्यक्त केली. येणाऱ्या समोर काळातही शिवसेना शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी झटणार असल्याचे हजारे साहेबांनी मनोगत व्यक्त केले. हा विजय कामगारांचा आणि शिवसेनेचा असून यासाठी अहोरात्र झटणार असल्याचे सर्वानुमते ठरले.
या बैठकीमध्ये सुरक्षा रक्षकांचे विविध समस्येचे निराकरण करण्याच्या हेतूने व माणिकगड सिमेंट कंपनी यांच्या होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी व सुरक्षारक्षक व कामगारांना न्याय, मूळ वेतन, व्हेज बोर्ड नुसार तासिका वेळ मिळवून देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कोरपना तालुक्याचे तालुकाप्रमुख राकेश राठोड, उपतालुकाप्रमुख आशिष भाऊ नामेवाड, गडचांदूर शहर प्रमुख विक्की राठोड, अरविंद गोरे, मोरेश्वर नक्षीने, राजू भाऊ बघेल, सुयोग अवताडे, सुरेश खापर्डे, मनोज खांडेकर इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी व सुरक्षा रक्षक परमेश्वर पिदुरकर, ईश्वर विदुरकर, बाळू राठोड, मोहन जाधव, विवेक नगराडे, नंदलालजी चौधरी, प्रवीण राठोड, संतोष रुईवाडे, मिलिंद सुखदेवी, संतोष महुर्ले, अंकुश सांगोळे, निलेश चिंचोलकर, अनिल चव्हाण, महिंद्रा आत्राम, प्रवीण चंदेलवार, मिथुन निमगडे आदी बहुसंख्येने सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.